Homeताज्या बातम्यादेश

इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक

अहमदाबाद विमानतळावरून घेतले ताब्यात घातपाताचा कट उधळला

नवी दिल्ली ः देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असतांनाच गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने इस्लामिक स्टेटच्या अर्थात इसिसच्या चार दहशतव

जिथे, जीभ लाकडाची बनते!
मोहरे येथे तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
देवेगौडा यांच्या नातवावर लैंगिक शोषणाचे आरोप

नवी दिल्ली ः देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असतांनाच गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने इस्लामिक स्टेटच्या अर्थात इसिसच्या चार दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून ताब्यात घेण्यात अले आहे. चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत.
अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले. पाकिस्तानी हँडलरच्या आदेशानंतर त्यांनी काहीतरी कट आखला होता. त्यामुळे हे दहशतवादी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या उद्देशाने पोहोचले होते, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. गुजरात पोलिसांच्या मदतीने एटीएसने चार आरोपींना बेड्या ठोकल्या. गुजरात पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने श्रीलंकेतून दहशतवादी पाठवण्यात आले होते.

ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांना टार्गेट लोकेशनवर पोहचण्याआधीच ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले चारही पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते. त्यांनी मोठा कट आखला होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील आदेशाची वाट पाहत होते, असेही समोर आले आहे. या दहशतवाद्यांना शस्त्रेही स्वतंत्रपणे पोहोचवली जाणार होती. एटीएसने या दहशतवाद्यांच्या फोनमधून एन्क्रिप्टेड चॅट जप्त केले आहेत. एटीएसकडून चारही दहशतव्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चॅट्समधून बरीच माहिती उघड झाली आहे.  सुरत पोलिसांकडून मौलवी सोहेल अबुबकरच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यावेळीच गुजरातमध्ये चार इसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलिस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. गुजरात पोलिसांकडून सर्व यंत्रणा अलर्टमोडवर ठेवण्यात आल्या आहेत. बारकाईने सर्व ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे.  

आयपीएलच्या सामन्याआधीच अटक – अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी 21 मे रोजी आयपीएलमधील प्लेऑफचा सामना होणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात ही लढत होणार आहे. या संघातील काही खेळाडू अहमदाबाद विमानतळावर दाखल होणार होते, काही दाखल झाले आहे. त्यावेळीच एटीएसने चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांचा नेमका काय कट होता? याबाबत चौकशी कऱण्यात येत आहे.  

COMMENTS