Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला

मुंबई ः मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरले आहे. तसेच अन्य 4 धरणे 95 टक्क्यांहून जास्त

मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार
उदगीर येथे पीएनजीतर्फे दागिन्यांचे प्रदर्शन-विक्री सुरू
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भूमिका रक्षकाची नसून भक्षकाची : राजू शेट्टी

मुंबई ः मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरले आहे. तसेच अन्य 4 धरणे 95 टक्क्यांहून जास्त भरली आहेत. जुलैमहिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. धो धो बरसलेल्या पावसाने मुंबईतील धरणांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली. अप्पर वैतरणा धरण 71.92 टक्क्यांनी भरले आहे. मोडकसागर 94.20 टक्के, तानसा 98.12 टक्के, मध्य वैतरणा 96.26 टक्के, भातसा 78.47 टक्के, विहार 100 टक्के, तुळशी 98.12 टक्क्यांनी भरले आहे.

COMMENTS