रत्नागिरी प्रतिनिधी - मुंबई-गोवा(Mumbai-Goa) महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटेनर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. अपघात खूप भीषण घडला आहे
रत्नागिरी प्रतिनिधी – मुंबई-गोवा(Mumbai-Goa) महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटेनर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. अपघात खूप भीषण घडला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये गॅस होता. अपघातामुळे गॅस लिकीज होऊ लागला होता. त्यामुळे प्रशासनाने त्या पुलावरुन जाणारी वाहतूकच पर्यायी मार्गाला वळवली. या अपघाताच्या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS