देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्यांचा सात बारा उतारा कर्जातून मुक्त करावा या मागणीसाठी 10 सप्टेंबर रोजी सकाळ

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्यांचा सात बारा उतारा कर्जातून मुक्त करावा या मागणीसाठी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहुरी तहसील कार्यालयावर कर्जमुक्ती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. कर्जमुक्तीचा पहिला मोर्चा राहुरीत होणार आहे.त्याचा वनवा माञ महाराष्ट्रभर पोहचणार आहे. सरकारला शेतकर्यांचा सातबारा उतारा कर्जमुक्त करावाच लागणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी दिली आहे.
देवळाली प्रवरा येथील जुने हनुमान मंदिरात कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकर्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.गोरक्षनाथ चव्हाण हे होते. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृष्णा मुसमाडे यांनी शेतकर्यांच्या व्यथा मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे कांद्याचे भाव पडले.शेतकर्यांनी लोकसभा निवडणूकीत सरकारला त्यांची जागा दाखविली आहे. शेतकर्यांनी एकजुट केली तर सरकार हि नरमेल. शेती मालास भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. यावेळी सतिष वाळुंज यांनी आपली भुमिका मांडताना सांगितले की,नोकदारास 8 ते 9 टक्के घर बांधणीसाठी कर्ज मिळते.परंतू शेतकर्यांना मात्र घर बांधणीसाठी कर्ज मागितले तर बँका दारात उभे करीत नाही. शेतकरी चांगल्या घरात राहिला नाही पाहिजे हिच तर सरकारची इच्छा आहे. कर्जमुक्ती योजना आंदोलनाची पहिली ठिणगी देवळाली प्रवरात पडली आहे. त्याचे लोण महाराष्ट्रभर पोहचले पाहिजे.कांद्याचे भाव पाडले म्हणून काँग्रेसचा पराभव झाला आहे. सत्ताधारी सरकारलाही धडा शिकविणे गरजेचे आहे. शेतकरी एकजुट झाला तरच सुजलाम सुफलाम होईल असे वाळुंज यांनी सांगितले. हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचेल. कर्जमुक्तीची देवळाली प्रवरातील पहिली ठिणगी महाराष्ट्रात पोहचेल.याठिणगीचा वनवा झाल्या शिवाय राहणार नाही असे लोंढे यांनी सांगितले. या बैठकीसाठी अँड संभाजीराव कदम, सुखदेव मुसमाडे, बाळासाहेब खुरुद, केदारनाथ चव्हाण,देवराम कडू, दिपक पठारे, रामनाथ उर्हे, प्रकाश कदम, सोपान उंडे, कृष्णा खांदे, प्रकाश ठोंबरे, बाबासाहेब उर्हे, ज्ञानेश्वर उर्हे, रविंद्र उर्हे, अर्जुन येवले, सुधाकर ढुस, यशवंत देठे, संजय कदम, गंगाराम मुसमाडे, दत्तु दळवी, बाबासाहेब संसारे, राजेंद्र सौदागर, दत्तात्रय पुजारी, उद्धव उर्हे, नामदेव चव्हाण, भागवत पठारे, अशोक मुसमाडे आदी उपस्थित होते.
COMMENTS