Homeताज्या बातम्यादेश

शेतकर्‍यांचे 21 जानेवारीला ‘चलो दिल्ली’

नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा आपले आंदोलन तीव्र करण्याची शक्यत आहे. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगत शेतकर्‍यांनी हरियाणा-पंजा

बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
किसन वीर साखर कारखाना निवडणूकीचे वारे; राष्ट्रवादीच्या आमदारासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे अवैध अर्ज वैध; जिल्हा उपनिबंधक मोहन माळी यांची घोषणा
कोयना धरणग्रस्तांच्या भूखंड गैरव्यवहार; शासनाच्या नोटीसीने खळबळ

नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा आपले आंदोलन तीव्र करण्याची शक्यत आहे. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगत शेतकर्‍यांनी हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमवरून राजधानी दिल्लीकडे 21 जानेवारीला कूच करणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये 101 शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले.
शेतकर्‍यांनी डिसेंबर महिन्यात शेतकर्‍यांनी तीनवेळा दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आहे. 6 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 14 डिसेंबर 2024 रोजी शेतकरी दिल्लीला रवाना झाले होते, परंतु तीनही वेळा हरियाणा पोलिसांनी त्यांना बॅरिकेडवर रोखले. शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी एमएसपी हमी कायद्याबाबत 11 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल 52 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

COMMENTS