सातारा प्रतिनिधी - मोदी शहांना मुंबई वर राज्य करायचे असून मराठी माणसाच्या हातातून मुंबईला तोडायचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळेच शिवसेनेवर हा
![](https://lokmanthan.com/wp-content/uploads/2023/03/download-2023-03-04T132428.448.jpg)
सातारा प्रतिनिधी – मोदी शहांना मुंबई वर राज्य करायचे असून मराठी माणसाच्या हातातून मुंबईला तोडायचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळेच शिवसेनेवर हा हल्ला गुजरातच्या हुकूम शहाने केला आहे. शिवसेना मुंबईत नसेल तर मराठी माणूस मुंबईत टिकणार नाही आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करता येईल असा डावा मोदी शहांनी आखला आहे. त्यामुळेच ते ईस्ट इंडिया कंपनीच्या हुकूमशाही ब्रिटिशांसारखे महाराष्ट्राबरोबर वागत आहेत. अशी टीका खा. संजय राऊत यांनी मोदी शहांवर साताऱ्यातील शिवगर्जना मेळाव्यात बोलताना केली आहे.
COMMENTS