Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धो धो पाऊस अन् नदीपात्रात पेटती चिता

हि धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली

औरंगाबाद प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी स्मशान भूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती
मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च सुनावणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद

औरंगाबाद प्रतिनिधी – राज्यात अनेक ठिकाणी स्मशान भूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक्यातील अमदाबाद येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने अडचण निर्माण झाली. नदीच्या पात्रात चिता रचून पेटवली. त्यानंतर लगेच पावसाचे आगमन झाले. यानंतर नदी दुथडी भरून वाहू लागले. जळती चिता वाहून गेली तर काय होईल, अशी चिंता नातेवाईकांना होऊ लागली होती. मात्र, सुदैवाने तशी दुर्घटना घडली नाही. स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

COMMENTS