Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडच्या 6 तालुक्यांची तेलंगणात समावेशाची मागणी

सीमावर्ती भागातल्या प्रश्‍नांसाठी कृती समिती आक्रमक

नांदेड प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक होत असून, आपल्या मागण्या मान्य करा, अन्यथा शेजारी राज्यात समावेश क

तोल गेला आणि थेट रेल्वेखाली पडला… प्रवाशाचा मृत्यू
राज्यभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
तुळजाभवानी मंदिरात आता ड्रेसकोड

नांदेड प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक होत असून, आपल्या मागण्या मान्य करा, अन्यथा शेजारी राज्यात समावेश करण्याची मागणी करतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक झाल्याचे चित्र असतांना, आता नांदेड जिल्ह्यातील 6 तालुक्यांनी थेट तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केली. तसेच या प्रकरणी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यासाठी प्रश्‍न सीमावर्ती भागातील नागरिकांचे ही कृती समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे या सीमावर्ती भागातील प्रश्‍न आणि त्यांची इतर राज्यात समावेश करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी ठरू शकते. या कृती समितीने म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यात अनेक तालुके मागास आहेत. तिथल्या लोकांना हव्या त्या सोयी-सुविधा मिळत नाही. मूलभूत सोयी-सुविधांसाठी आमचा संघर्ष सुरु असतांना, प्रशासन आणि राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
या समितीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या 40 गावांवर दावा करणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे या वादाला सुरुवात झालीय. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या 40 गावांनी आम्हाला कर्नाटकमध्ये घ्या, असा ठराव 2012 मध्ये केला होता. पाणीप्रश्‍नाला कंटाळून या गावांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या ठरावाचा आम्ही आता गांभीर्याने विचार करत आहोत. सांगतली जिल्ह्यातल्या गावांवर दावा सांगणार आहोत, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दिलाय. त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकही गाव देणार नाही. उलट बेळगाव, कारवार, निपाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे सडेतोड उत्तर दिलेय. एकीकडे सीमावर्ती भागातल्या चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केलाय. तर दुसरीकडे पंढरपूरच्या नागरिकांनी चक्क कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय. चंद्रभागेच्या तीरावर होणार्‍या कॉरिडॉरला विरोध म्हणून नागरिक आक्रमक झालेत. आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर येणार्‍या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यासाठी नागरिकांनी नुकतेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलनही केले. येणार्‍या काळात यावरूनही वाद पेटण्याची शक्यता आहे.

तेलंगणात मिळतात या सुविधा – नांदेड जिल्ह्यातील या 6 तालुक्यांना तेलंगणात का सहभागी व्हावे असे वाटते, या शोध घेतला असता, या ग्रामस्थांची धारणा वेगळी आहे. तेलंगणात  मजूर, नोकरदार आणि विशेषतः शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार उभे राहते. मोफत वीज, पाणी, बी-बियाणे, शेती अवजारे मिळतात. कृषीपंप, विहिरीच्या योजना आहेत. त्यामुळे तिकडे जीवन सुकर होईल, असे या भागातल्या ग्रामस्थांना वाटते. तेलंगणा सरकार गरिबांना मदत करण्यासाठीही सरसावले आहे. त्यांच्यासाठी दिन बंधू योजना राबवते. त्यातून त्यांना घरे मिळतात. व्यवसायासाठी आर्थिक मदत होते. तिथे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था चांगली आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थित मदत तर होतेच. शिवाय चार एकर जमीन मिळते. त्यामुळे या नागरिकांनी तिकडे जायची इच्छा व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS