शिक्षकांच्या सभेत गोंधळ…धक्काबुक्की व तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांच्या सभेत गोंधळ…धक्काबुक्की व तोडफोड

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडले. यानंतर गोंधळ

25 गोशाळेसाठी वर्धमान संस्कार धामकडून 25 लाखांची देणगी
राहुरी तालुक्यातील टेलरच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड
BREAKING: आता नगरकरांचा जनता कर्फ्यू | Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडले. यानंतर गोंधळ, आरडाओरडा करीत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, एकमेकांशी हमरीतुमरी व धक्काबुक्की करणे, ध्वनिक्षेपकाची मोडतोड, परस्परांची लायकी काढणे, अशी दरवर्षीची परंपरा यंदाही सत्ताधारी व विरोधकांनी कायम राखली. असे सगळे प्रकार घडल्यानंतर सत्ताधार्‍यांनी अखेर सभा अजेंड्यावरील विषयांचे वाचन न करताच मंजूर मंजूरच्या घोषणा देत सभा गुंडाळली.
माध्यमिक शिक्षक सोसायटीची 79 वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे दोन वर्षे सभा ऑनलाईन पद्धतीने झाली होती. मात्र, यंदा प्रत्यक्ष सभा झाली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडले. त्यांच्यात सभा सुरू झाल्यापासून शाब्दिक चकमकी झडत होत्या. सभासद शिक्षकांची उपस्थिती कमी होती. पण त्याचा कोणताही परिणाम न होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली व दोन्ही बाजूंनी आपली खुमखुमी जिरवून घेतली गेली. या सभेत पोलिस बंदोबस्तही मागवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नव्हता. सत्ताधारी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे आणि विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे व अप्पासाहेब शिंदे यांच्याशी सोसायटीतील विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा अनेकदा रंगला. या सभेत भाडेतत्त्वावर डाटा सेंटरची उभारणी, जागा खरेदी, नोकर भरती, मयत निधी, संस्थेचा कारभार ऑनलाइन झाला की नाही, मागील इतिवृत्तात सभासदांनी मांडलेल्या मुद्यांचा समावेश नसणे, सभा कायदेशीर की बेकायदा असे अनेक विषय गाजले. डाटा सेंटर त्रयस्थ संस्थेच्या मदतीने भाडेतत्त्वावर उभारणीस बोडखे यांनी विरोध नोंदवला. सभासद सुनील दानवे, सुनील पंडित, मारुती भालेराव, आत्माराम दहिफळे, देवीदास पालवे, संजय फटांगरे, सुनील वाळुंज, भाऊसाहेब काळे, किशोर मुथा आदी चर्चेत सहभागी झाले होते. दरम्यान, शिक्षकांची सभा गोंधळाविना पार पडली तर ती आश्‍चर्याची घटना मानली जाणार असल्याने दोन वर्षांनी झालेल्या सभेत शिक्षकांनी घातलेला गोंधळ नेहमीची परंपरा जपणारा होता, अशी उपरोधिक प्रतिक्रिया शिक्षकातून व्यक्त झाली.

COMMENTS