लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली असून खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना

लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली असून खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणार्या मुलीने विनयभंगाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही मुलगी आठवीत शिकत होती. विनयभंगाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS