अहिल्यानगर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात महानगरपालिकेच्या शाळांमधूनही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचे शिक्षक करत आ

अहिल्यानगर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात महानगरपालिकेच्या शाळांमधूनही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचे शिक्षक करत आहेत. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढणार नाही, अशा पद्धतीने त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. विद्यार्थ्यांनीही मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून अभ्यासासह खेळालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
महानगरपालिकेच्या रेल्वे स्टेशन येथील शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शाळेच्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, शूज इत्यादीचे वाटप करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शाळेत ‘अतिसारावर करूया मात, स्वच्छ व ओआरएसची घेऊन साथ’ हा उपक्रमही राबवण्यात आला.
जिजामाता आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर शेख यांनी अतिसार होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता, तसेच अतिसार झाल्यास करावयाच्या उपायोजना विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या. या उपक्रमांतर्गत हात धुण्याचे प्रात्यक्षिक, ओआरएस बनवण्याचे प्रात्यक्षिक, डेंग्यू आळ्या तसेच गप्पी मासे दाखवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी सकाळ एनआयई समूहाचे वितरण शाखा प्रमुख देविदास आंधळे व समन्वयक शिल्पा धोपावकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व अंकाचे वाटप केले. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप बागल, साथरोग अधिकारी सृष्टी बनसोडे, आरोग्य अधिकारी आयेशा शेख, स्टाफ नर्स, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय घिगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. भारती कवडे, मनीषा गिरमकर, वर्षा गायकवाड, विठ्ठल आठरे, मेघना गावडे, दीपाली नवले, शबनम खान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
COMMENTS