नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. अन्नधान्यांसह, गहू, तांदूळ, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतांना दिसून

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. अन्नधान्यांसह, गहू, तांदूळ, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतांना दिसून येत आहे. दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाईवर अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील असले तरी, अजूनही महागाईवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.
इस्त्रायल आणि हमास युद्ध, रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जातांना दिसून येत असतांना, देशात देखील महागाईने नवा उच्चांक गाठतांना दिसून येत आहे. त्यामुळे घरा-घरांतील आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक अहवालात असे म्हटले आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अलीकडेच झालेली घसरण आणि मूळ चलनवाढीतील सततची घसरण, यामुळे महागाईचा दबाव कमी होण्यास मदत झाल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्थ मंत्रायलच्या अहवालानुसार मध्यवर्ती बँकेलाही या परिस्थितितची पूर्ण जाणीव असून त्यांच्या संकेतांनुसार अत्यंत आवश्यक असेल तरच व्याजदरात (रेपो दर) आणखी वाढ केली जाईल. महागाईच्या आघाडीवर जागतिक बाजारात बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली पडझड आणि कोअर इन्फ्लेशनमधील सततच्या घसरणीमुळे पुढील काळात महागाईचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने गहू, तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातींवर बंदी घालण्यापासून ते स्वस्त दरात टोमॅटो विकण्यापर्यंत अनेक पावले उचलली. तथापि, अजूनही चिंता कायम असून मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने आपले मासिक बुलेटिनमध्ये म्हटले होते की सणासुदीच्या काळातील मागणी उत्साहवर्धक आहे आणि ग्राहकांची भावनाही ‘उत्साही’ आहे. पण भारताला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे आणि महागाईवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. अर्थ मंत्रालयाच्या अहवालात जागतिक मंदीच्या काळात ठोस देशांतर्गत मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्था ‘विलक्षण लवचिक’ राहिली असल्याचाही पुनरुच्चार करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांनी जीडीपी विकास दर नोंदवेल असा सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.
महागाई आटोक्यात आणण्यात अपयश – आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारकडून महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र यंदा झालेला अपुरा पाऊस, त्याचबरोबर जागतिक परिस्थितीमुहे महागाई आटोक्यात येण्यास विलंब होतांना दिसून येत आहे. ऑक्टोबर कोअर रिटेल चलनवाढीचा दर चार महिन्यातील नीचांक म्हणजे 4.87 टक्क्यांवर घसरला होता. त्यामुळे सलग दुसर्या महिन्यात महागाईचा दर आरबीआयने ठरवलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेतच राहिला. मात्र, अन्न-धान्य महागाईचा दर किंचित वाढीसह 6.61 टक्क्यांवर पोहोचला आहे.
COMMENTS