Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय तपाय यंत्रणेची मोठी कारवाई

मुंबई प्रतिनिधी - राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज सकाळपासून एनआयए एकूण 44 ठिकाणी छापे

विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !
युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
सासूने सुनेच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज सकाळपासून एनआयए एकूण 44 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारी दरम्यान १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. ठाण्याजवळील पडगा,पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

या कारवाईत भिवंडीच्या पडघा गावातून एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. पुण्यामधून दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. तसेच पुणे आणि इतर ठिकाणीही सुरक्षा यंत्रणांची छापेमारी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे.

COMMENTS