Homeताज्या बातम्यादेश

समाजमाध्यमांवरील असत्यामुळे सत्याचा बळी

सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली : सध्या समाज माध्यमांवर खोटया बातम्यांचे पीक आल्यामुळे त्यात सत्याचा बळी जात आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमकरता असलेल्या युगात आज आपण रा

पत्नीची गळा चिरुन हत्या | LOKNews24
लॉकअप मधील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न.
महाराष्ट्रात एका वर्षात 183 जणींची अनैतिक संबंधातून हत्या

नवी दिल्ली : सध्या समाज माध्यमांवर खोटया बातम्यांचे पीक आल्यामुळे त्यात सत्याचा बळी जात आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमकरता असलेल्या युगात आज आपण राहात आहोत, असे परखड मत सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. ‘अमेरिकन बार असोसिएशन’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रवास आणि तंत्रज्ञानामुळे मानवतेचा विस्तार झाला, परंतु आपण व्यक्ती म्हणून ज्यावर विश्‍वास ठेवतो तेही आपण स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे मानवतेची पीछेहाटही झाली आहे. हेच खरे तर आपल्या युगाचे आव्हान आहे. कदाचित हे तंत्रज्ञानाचे ‘उत्पादन’ असावे, असेही सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड म्हणाले. जेव्हा राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला, तेव्हा इंटरनेट, समाजमाध्यमे नव्हती. आपण ‘अल्गोरिदम’द्वारे नियंत्रित केल्या जाणार्‍या जगात राहत नव्हतो. आता समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे, बीज म्हणून जे काही सांगितले जाते त्याचाच सिद्धांत होतो, ज्याची तर्कशुद्ध विज्ञानाच्या कसोटीवर चाचणी केली जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले. समाजमाध्यमांवरील टीका-टिपण्यांवर भाष्य करताना सरन्यायाधीश म्हणाले, “समाजमाध्यमांत जल्पकांकडून (ट्रोल) केल्या जाणार्‍या टीकेपासून न्यायाधीशही सुटलेले नाहीत. प्रत्येक छोटया कृतीसाठी आम्हाला (न्यायमूर्ती) आणि तुम्हालाही तुमचा दृष्टिकोन समजून न घेता कुणाच्या तरी टीकेला तोंड द्यावे लागते, असेही ते यावेळी म्हणाले.

COMMENTS