Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘लगान’फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचं अल्पशा आजारानं निधन

मुंबई प्रतिनिधी - जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला. बॉलीवूडमध्ये सहाय्यक भूमिकांसोबतच त्याने कॅमिओ देखील केले. जवळपास 150 हिंदी चित्रपट

बँकांनी कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट 31 मार्च पूर्वी पूर्ण करावे : नरेंद्र पाटील
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज
मराठी नवीन वर्ष म्हणजेच ‘गुढी पाडवा’ याचं महत्व काय? पहा हा SPECIAL VIDEO | GUDI PADWA | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला. बॉलीवूडमध्ये सहाय्यक भूमिकांसोबतच त्याने कॅमिओ देखील केले. जवळपास 150 हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांवर वेगळी छाप सोडली. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी स्टारर ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटात पोलीस हवालदाराची भूमिका करून त्याने सर्वांना हसवलं होतं केल्या.त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या जाण्याने सिनेजगतात शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांना 2001 मध्ये आलेल्या ‘लगान’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. याशिवाय ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे ​​इंडिया’मधील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. जावेद खान यांनी ‘मिर्झा गालिब’ या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. जावेद खान अमरोही यांनी झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनय विद्याशाखा म्हणूनही काम केले आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी ‘चंद्रकांता’चे अखिलेश मिश्रा यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरून दिली, त्यानंतर सर्वत्र शांतता पसरली.त्यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले

COMMENTS