उत्तर प्रदेश प्रतिनिधी - असं म्हणतात की लग्न हे एक अतूट नातं आहे, जे प्रत्येकाला जपायचं असतं. असे मानले जाते की लग्नानंतर एखाद्या व्यक्तीचे नव

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – असं म्हणतात की लग्न हे एक अतूट नातं आहे, जे प्रत्येकाला जपायचं असतं. असे मानले जाते की लग्नानंतर एखाद्या व्यक्तीचे नवीन आयुष्य सुरू होते, परंतु काहीवेळा काहीतरी अप्रिय घडते, जे माणूस आयुष्यभर सहन करू शकत नाही. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात समोर आले आहे. जिथे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे, तर दुसरीकडे दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्याचवेळी वरालाही धक्का बसला आहे. वैशाली त्यागी यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीतच्या नॅशनल हायवे अथॉरिटीमध्ये इंजिनीअर असलेल्या पारस त्यागीचे लग्न गाझियाबादमधील वैशाली त्यागीशी झाले होते. गेल्या शुक्रवारी पारस त्यागी आपल्या नववधूसोबत गाझियाबाद येथील घरी पोहोचला. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, ढोल-ताशांचा कार्यक्रम सुरू होता. स्त्रिया नाचत होत्या, गात होत्या, सर्व काही व्यवस्थित चालले होते.
दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी वैशाली आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. तेथे वैशाली त्यागी गिझरच्या पाण्याने अंघोळ करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी गिझरमधून गॅस बाहेर पडल्याने वैशालीचा जीव गुदमरला. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वैशाली त्यागीला मृत घोषित केले. या घटनेनंतर वैशालीचे आई-वडील आणि सासरच्या मंडळीत शोककळा पसरली.
COMMENTS