वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या

Homeताज्या बातम्या

वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या

दोन्ही मुलांना विष पाजून वडिलांनी संपविलं स्वतःला दुहेरी हत्याकांडाने खळबळ

चंद्रपूर प्रतिनिधी -  दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या ग

माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना दिलासा
शालेय विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली 

चंद्रपूर प्रतिनिधी –  दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या गावात शेतात वडिलाचा मृतदेह सापडला. विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात आर्थिक विवंचनेतून मुलांची हत्या केल्याचा तसेच आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. वरोरा शहराजवळील बोर्डा  गावात काल संजय कांबळे या व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा विष पाजून त्यांचा खून केला होता. सुमित (7) आणि मिष्टी (3) अशी मृतक मुलांची नावं आहेत. वरोरा आणि गिरड पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS