सांगली प्रतिनिधी - रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग सांगलीच्या नागज फाट्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी गावानजीक भीषण अपघात झाला. रस्त्
सांगली प्रतिनिधी – रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग सांगलीच्या नागज फाट्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी गावानजीक भीषण अपघात झाला. रस्त्यात काम सुरू असल्याने आणि काही ठिकाणी खड्डे असल्याने वारकऱ्यांची ट्रक पलटी झाली. ट्रक मध्ये 30 ते 35 लोक असल्याचे समजते. यातील 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस, तहसीलदार बि. जे. गोरे यांनी तातडीने भेट देऊन रुग्णांना हॉस्पिटल कडे रवाना केले आहे.

COMMENTS