बैल पोळ्याच्या दिवशीच ’सर्जा-राजा’चा होरपळून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैल पोळ्याच्या दिवशीच ’सर्जा-राजा’चा होरपळून मृत्यू

वर्धा : जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी येथे बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागल्याने आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सो

केंद्रीय मंत्री कोशल किशोरच्या घरी तरूणाची हत्या
महिला लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : महाराष्ट्रात 2119 महिला लाभार्थ्यांना 401.25 कोटीची आर्थिक मदत मंजूर
मुंबईतील वाढते प्रदूषण चिंताजनक

वर्धा : जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी येथे बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागल्याने आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सोबतच गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगोळी झाल्याने शेतकर्‍यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पोळा सणाच्या दिवशी संकट कोसळल आहे. धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी सतीश रामकृष्ण सोनवणे यांनी गावाशेजारील गोठा उभारला आहे. या गोठ्यात जनावरांसह जनावरांचे वैरण आणि शेती उपयोगी विविध साहित्य ठेवले जायचे. गुरूवारी पोळा सणाचे औचित्य साधून रात्रीला गोठ्यात बांधून असलेल्या बैलांचे खांद शेकल्यावर शेतकरी घरी परतला.

COMMENTS