Homeताज्या बातम्या

सुरहा तलाव देशातील 100 वे रामसर स्थळपर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या पर्यावरण संवर्धनाच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून उत्तर प्रदेशातील ब

आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  
सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  


नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या पर्यावरण संवर्धनाच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहारातील सुरहा तलावाला देशातील शंभरावे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करताना देशाच्या पाणथळ क्षेत्रांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे मोठे फलित असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्था आणि नागरिकांचे अभिनंदन केले. पर्यावरण संरक्षण आणि शाश्‍वत विकासाचा मार्ग अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरहा तलाव हा अनेक स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे निवासस्थान मानला जातो. या भागातील समृद्ध जैवविविधता आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन त्याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. या मान्यतेमुळे भारतातील पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर अधिक बळ मिळणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत देशभरातील पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण, पुनरुज्जीवन आणि व्यवस्थापन यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. स्थानिक समुदायांचा सहभाग, वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि जनजागृती यांच्या माध्यमातून हे प्रयत्न अधिक प्रभावी करण्यात आले आहेत. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणीय संतुलनाचे रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व हरित भविष्य निर्माण करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी पर्यावरण क्षेत्रातील देशाच्या यशस्वी वाटचालीचाही उल्लेख केला. हरित क्षेत्रात झालेली वाढ, वन्यजीवांच्या संख्येत झालेली सुधारणा आणि पर्यावरणपूरक धोरणांचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या धोरणांसोबतच नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा मिळाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS