काल आम्ही या सदरामध्ये लिहिलं होतं की, देशाचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार, यांची नेमकी भूमिका काय आहे? हे काही स्पष्ट होत नाही. आता हेच बघा,

काल आम्ही या सदरामध्ये लिहिलं होतं की, देशाचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार, यांची नेमकी भूमिका काय आहे? हे काही स्पष्ट होत नाही. आता हेच बघा, पहलगामवरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने थेट पाकिस्तान विरुद्ध युद्धाची भूमिका घेतली. त्यावेळी, सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकार यांच्या भूमिकेशी सहमत होते. कुठलीही कृती केली तर त्यांच्याबरोबर सोबत असण्याचे, विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलेलं होतं. आता, विरोधी पक्षांचा आवाज हा युद्धजन्य स्थितीमध्ये सत्ताधारी पक्षांबरोबर सुर जुळवणारा होता. त्याची देशाला गरज होती. परंतु, लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हा समतोल असावा लागतो. हा समतोल कोण, कुठे आहे? हे देखील जनतेसमोर स्पष्ट व्हायला मदत करतो. काल इंडिया आघाडीच्या अनेक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. ज्या पत्रावर काँग्रेससह समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कझगम, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, भाकपा लिबरेशन, केरळ काँग्रेस, व्हीसीके आणि एमडीएमके या नेत्यांच्या सह्या असणारे हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपविण्यात आले. त्यामध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून पहलगामवरील दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला, आणि त्याचबरोबर सरकारने पाकिस्तान विरोधी जी कृती केली, ती अचानक का थांबवली याचं स्पष्टीकरण सरकारला संसदेमध्ये देता येईल. हे सगळं जाणून घेण्याचं एक श्रेय देखील सरकारला मिळवता येईल; असं म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलं. परंतु, इंडिया आघाडीचा भाग असलेले शरद पवार मात्र या घडामोडी पासून अलिप्त आहेत. प्रश्न हा नाही की, शरद पवार य इंडिया आघाडीबरोबर आहेत किंवा नाही! तर, प्रश्न हा आहे की, शरद पवार हे त्यांच्या मतदारांबरोबर त्यांची स्वतःची ही आणि देशाच्या जनतेची ही आणि सर्व राजकीय पक्षांची ही फसवणूक करत आहेत! ते नेमके कोणाबरोबर आहेत? सत्ता पक्षाबरोबर आहेत की विरोधी पक्षाबरोबर आहेत, की, अन्य काही त्यांनी तिसरा गट स्थापन केला आहे, हे काहीही समजायला मार्ग नाही. त्यामुळे शरद पवार यांचं हे रहस्यमय राजकारण, हे त्यांच्यासाठी कदाचित फायद्याचं असू शकेल; परंतु, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष त्यांचे मतदार आणि त्यांच्या पक्षाचे अनुयायी किंवा समर्थक या सगळ्यांची फसवणूक करणारं आहे. त्यामुळे, शरद पवार यांनी त्यांची राजकीय भूमिका कितीही ते राजकारणातील ज्येष्ठ नेते असले, तरी, नव्या पिढीतील तरुणांना प्रेरणादायी ठरावी. किंबहुना, राजकारणातील नैतिकता नव्या पिढीला जोपासता यावी, यासाठी तरी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे नमूद करावी. ते सत्ताधारी पक्षांचे समर्थन करत असतील तरी ते एक चांगलं पाऊल आहेच! परंतु, ते विरोधी पक्षांचं समर्थन करत असतील, तरी ते एक चांगलं पाऊल असेल! परंतु, एकाच वेळी त्यांनी दोन्ही गटांना गृहीत धरण आणि त्यांची फसवणूक करणं, हे काम मात्र करू नये. कारण, यामुळे देशाच्या राजकारणाविषयी नवतरुणांना चुकीच मार्गदर्शन जातं. त्यामुळे एक चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे, शरद पवार यांच्या रहस्यमय राजकारणाचा संदेश देशाच्या मतदारांसमोर, जनतेसमोर, राजकीय पक्षांसमोर सत्ताधारी आणि विरोधी या सगळ्यांच्या समोर होणं गरजेचं आहे. अन्यथा, राजकीय मुत्सद्दीपणाच्या नावाखाली शरद पवार आख्या देशाची फसवणूक करित असल्याचे गृहीत धरले जाऊ शकते!
COMMENTS