Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही

मंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

मुंबई : कुणाच्यातरी ताटातले काढून दुसर्‍याला वाढायचे ही राज्य सरकारची भूमिका नाही, ओबीसींच्या आरक्षणातून कुठलंही आरक्षण काढले जाणार नाही, त्यांच्

ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब… ठाकरे सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेना
ओबीसी आरक्षणावरून निवडणूक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्याणाला झटका… सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

मुंबई : कुणाच्यातरी ताटातले काढून दुसर्‍याला वाढायचे ही राज्य सरकारची भूमिका नाही, ओबीसींच्या आरक्षणातून कुठलंही आरक्षण काढले जाणार नाही, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली. मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात या बेठकीत चर्चा करण्यात आली. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, मुंबई, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करा अशा मागण्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसमोर केल्या. मराठा समाजाच्या मागण्यांवर उद्यापासून अधिक गतीनं काम सुरु करा अशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात येणार आहेत अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली. शंभूराज देसाई म्हणाले की, शिष्टमंडळाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने गुन्हे मागे घेणं, मुंबई, हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करणं हे मुद्दे होते. त्यासंदर्भात मी आणि चंद्रकांतदादांनी तात्काळ त्यासंदर्भात कामाला लागावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आहे. हैदराबाद गॅजेट लागू करा, सगेसोयर्‍यांचं नोटिफिकेशन काढा या सगळ्या जरांगेंच्या मागण्याचे ड्राफ्ट नोटिफिकेशन काढण्यावर चर्चा आहे. ओबीसींच्या आरक्षणातून कुठलंही आरक्षण काढलं जाणार नाही, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही.

COMMENTS