विजेच्या पोलवर दिव्यांऐवजी पेटल्या मशाली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेच्या पोलवर दिव्यांऐवजी पेटल्या मशाली

नगर : प्रतिनिधी रामवाडीत अंधार पोलवर पेटल्या मशाली.लाईट,पाणी,अस्वच्छता आदि प्रश्न प्रलंबित .याचा निषेध म्हणून काल बुधवारी रात्री स्थानिक नागरिकांन

चांगल्या कार्याचा सन्मान करणे हे साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कर्तव्य – नगरसेवक सुनिल त्र्यंबके
राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप
Ahmednagar : वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान

नगर : प्रतिनिधी

रामवाडीत अंधार पोलवर पेटल्या मशाली.लाईट,पाणी,अस्वच्छता आदि प्रश्न प्रलंबित .याचा निषेध म्हणून काल बुधवारी रात्री स्थानिक नागरिकांनी  पोलवर मशाली पेटवून आंदोलन केले.गेली अनेक दिवस सर्जेपुरा – रामवाडी परिसरातील पोल वरील दिवे बंद असून त्याचा निषेध म्हणून पोलवर टेंबे लावून महानगरपालिकेचा परिसरातील नागरिकांनी  निषेध नोंदविला. गेल्या अनेक दिवसांपासून रामवाडी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मात्र या मशाल आंदोलनाने हा परिसर उजळून निघाल्याचे रात्री दिसत होते .

रामवाडी हि शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी या परिसराची लोकसंख्या काही हजाराच्या घरात आहे. विविध समस्यांनी हा परिसर ग्रासलेला,आहे. अंधाराच्या साम्राज्या बरोबरच या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे झालेले अर्धवट काम आणि स्वच्छतेची दुर्दशा, असा परिस्थितीत परिसरातील नागरिक जीवन कंठत आहेत. काल रात्री केलेल्या टेंबे आंदोलनाने तरी महानगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.त्याच बरोबर इतर समस्यांचे निराकरण करावे अशी या परिसरातील लोकांची मागणी आहे.  

या परिसरात स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याने या परिसराला कोणी वाली आहे का नाही असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.तरी पालिका प्रशासनाने या परिसरातील समस्यांचे तातडीने निराकारण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.   या आंदोलनात विकास उडाणशिवे, सलीम पठाण , सोमनाथ लोखंडे, आलीम शेख, वाजिद शेख, ईलियास शेख,विकास धाडगे, समदभाई तांबोळी , सचिन साळवे, अमोल साबळे ,आदींनी सहभाग घेतला.       

COMMENTS