महाविकास आघाडी सरकार पडणारचः चंद्रकांतदादा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार पडणारचः चंद्रकांतदादा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडील सरकार पडणार असल्याचे भाकीत केले.

धुळ्यात मेंढपाळ कुटुंबावर बिबट्याचा हल्ला  
समीर वानखेडे भाजपच्या वाटेवर
राजकीय खेळी त्वरीत अंकुशात आणायला हव्या !

पंढरपूर/प्रतिनिधी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडील सरकार पडणार असल्याचे भाकीत केले. सरकार पडणारच, हे आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असे ते म्हणाले. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पाटील पंढरपुरात आले होते. 

या वेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही. सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही, असे सांगून ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. टाळेबंदीला आमचा विरोध नाही. हे आम्ही आधीपासून सांगतो आहोत. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे; परंतु गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्याचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही. 

दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही, असेही ते म्हणाले. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. सरकारने आरोग्य यंत्रणेचे काहीच नियोजन केले नाही.  आमदारांच्या विकासनिधीतील चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, शी टीका पाटील यांनी केली. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआयकडून होत असलेल्या चौकशीवरही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सीबीआय चौकशीतून जे दोषी आहेत, ते उघड होईल. दोषी असणार्‍यांवर गुन्हा नोंदवला जाईल. तसेच त्यांच्यावर अटकेपासून ते सर्व कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS