नगर तालुक्याच्या युरियाचे परस्पर दुसरीकडे वाटप ; कृषी अधिकार्‍यांचा प्रताप, कार्ले यांचा तक्रार करण्याचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर तालुक्याच्या युरियाचे परस्पर दुसरीकडे वाटप ; कृषी अधिकार्‍यांचा प्रताप, कार्ले यांचा तक्रार करण्याचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी -नगर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी बफर स्टॉक करून ठेवलेल्या युरियाच्या साठ्यापैकी 205 मेट्रीक साठा अन्य तालुक्यांना परस्पर वाटप करण्या

Kopargoan : आमदार आशुतोष काळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा l LokNews24
वाळकी गटात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी : बाळासाहेब हराळ
अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती

अहमदनगर/प्रतिनिधी -नगर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी बफर स्टॉक करून ठेवलेल्या युरियाच्या साठ्यापैकी 205 मेट्रीक साठा अन्य तालुक्यांना परस्पर वाटप करण्यात आला आहे. हा उद्योग कृषी विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणी थेट कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्थायी समितीची बैठक झली. सभेला उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, उमेश परहर, मीराताई शेटे, सदस्य कार्ले, माधवराव लामखडे, सुप्रिया झावरे, अनिता हराळ आणि महेश सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगर तालुक्यातील युरिया खताच्या बफर स्टॉकचा विषय चर्चेत आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या खतांच्या नियंत्रण समितीच्या बैठकीत नगर तालुक्यासाठी 676 मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश कृषी उद्योग विकास मंडळाला देण्यात आले होते. मात्र, या मंडळाच्या अधिकार्‍यांनी परस्पर नगर तालुक्यासाठीचा युरिया खतांचा स्टॉक परस्पर अन्य तालुक्यांना वाटप केला. याबाबत कोणालाही कल्पना दिली नाही. ही बाब उघड झाल्यानंतर महामंडळाच्या संबंधित अधिकार्‍याला स्थायी समितीच्या बैठकीला बोलविण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकारी बैठकीकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे युरिया खताची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी जिल्हा परिषद कृषी विभाग जिल्हाधिकारी यांच्या सनियंत्रण समितीकडे तक्रार करणार आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य कार्ले हे राज्याच्या कृषी मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

परिचारिकांना सेवेत घ्या
अर्धवेळ परिचारिकांना नेमणुकीच्या गावात काम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिका यांना महिन्याला केवळ तीन हजार मानधन देण्यात येत असून त्यांना नेमणुकीच्या गावाऐवजी दुसर्‍या गावात कामासाठी पाठविण्यात येत आहे. शंभर रुपये रोज मिळणार्‍या या अर्धवेळ परिचारिकांना दुसर्‍या गावात जाण्यासाठी पदरमोड करावी लागत असून यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने यापुढे या परिचारिकांना त्यांना नेमणूक असणार्‍या गावात काम देण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समिती ठराव करून शासनाला पाठविणार आहे. हा विषय सदस्य कार्ले यांनी काढला. तसेच चांगले काम करणार्‍या अर्धवेळ परिचारिकांना शासनाने वर्ग 4 सेवेत सामावून घेण्याची मागणी कार्ले यांनी यावेळी केली.

COMMENTS