Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात तुरळक ठिकाणी मेघगर्जने सह वादळी वारे वाहण्याची शक्यता

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने हवामानविषयक इशारे देण्यासाठी जारी केलेल्या अखिल भारतीय हवामान अहवालानुसार येत्या चार दिवसांत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा तसेच केरळ यांसह देशाच्या विविध भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

पुणे विद्यापीठात वर्गणी न दिल्याने राडा
सेल्फीचा मोह सुटेना, गमावला जीव | LOKNews24
सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका दिसत नाही.

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने हवामानविषयक इशारे देण्यासाठी जारी केलेल्या अखिल भारतीय हवामान अहवालानुसार येत्या चार दिवसांत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा तसेच केरळ यांसह देशाच्या विविध भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

याकाळात, या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी या वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. या काळात विदर्भ, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीच्या काही तुरळक भागासह देशाच्या अनेक भागांत जोरदार विजा चमकतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल. तर 28 आणि 29 एप्रिल या कालावधीत केरळमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची दाट शक्यता आहे.29,30 एप्रिल आणि 1 मे या दिवशी राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वाळूचे वादळ येण्याची शक्यता आहे असा इशारा विभागाने दिला आहे. स्थळविशिष्ट हवामान अंदाज आणि इशारे यांच्यासाठी कृपया “मौसम” अप्लिकेशनचा वापर करावा . कृषीविषयक हवामान अंदाजासाठी “मेघदूत” अप्लिकेशनचा तर विजेबद्दलचे इशारे समजून घेण्यासाठी “दामिनी” अप्लिकेशनचा तसेच जिल्हानिहाय हवामानविषयक इशारे समजून घेण्यासाठी राज्याच्या हवामान केंद्राच्या किंवा प्रादेशिक हवामान विभागाच्या संपर्कस्थळाला भेट देत वरील डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.

COMMENTS