देशमुखांना झटका ;उच्च न्यायालयातील याचिका फेटाळली

Homeताज्या बातम्यादेश

देशमुखांना झटका ;उच्च न्यायालयातील याचिका फेटाळली

ईडीनंतर आता सीबीआय करणार चौकशीनवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईनंतर सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला आहे. सीबी

Beed : बीड जिल्ह्यातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करा (Video)
Sangamner : संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (Video)
महाराष्ट्र एकीकरण समितीला संधी द्या

ईडीनंतर आता सीबीआय करणार चौकशी
नवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईनंतर सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे हा अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहणार्‍या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला देखील मोठा झटका मानला जात आहे.
अनिल देखमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतलेला असताना महाराष्ट्र सरकारने त्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, तसेच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधल्या दोन परिच्छेदांमध्ये यासंदर्भातले उल्लेख करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळल्यामुळे राज्य सरकारसाठी देखील हा धक्का ठरला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचा सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने देशमुख आणि राज्य सरकारच्या याचिकेवर युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने सुनावणीच्या वेळी देशमुखांवरील आरोपांशी संबंधित सगळ्यांची चौकशी सीबीआयने करायला हवी, असे मत नोंदवले होते. देशमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या प्रकरणी तक्रार का दाखल केली नाही, तसे करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते, असा प्रश्‍न उपस्थित करून परमबीर यांच्या भूमिकेवरही न्यायालयाने बोट ठेवले होते.

COMMENTS