जातीनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेऊ : पंतप्रधान मोदींचे आश्‍वासन

Homeताज्या बातम्यादेश

जातीनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेऊ : पंतप्रधान मोदींचे आश्‍वासन

नवी दिल्ली: जातीनिहाय जनगणना करण्यासाठी प्रादेशिक पक्ष आक्रमक झाले असून, सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय शिष्ट

जुनी गाडी स्क्रॅप केल्यास नव्या वाहनाची नोंदणी मोफत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ पाळणार : पंतप्रधान
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वाजले सूप ; लोकसभा मुदतीआधीच अनिश्‍चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली: जातीनिहाय जनगणना करण्यासाठी प्रादेशिक पक्ष आक्रमक झाले असून, सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. जातीनिहाय जनगणनेसाठी योग्य निर्णय लवकरच घेऊ असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी या शिष्टमंडळाला दिले.
जातीनिहाय जनगणनेसाठी उत्सुक नसलेल्या भाजपचाही या शिष्टमंडळात समावेश होता. या चर्चेनंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमची जी बाजू आहे ती पूर्णपणे आम्ही पंतप्रधानांसमोर मांडली. जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही का करत आहोत हेही त्यांना पटवून दिले आहे. या संदर्भात निश्‍चितच योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासनही पंतप्रधानांनी आम्हाला दिले आहे, असे नितीशकुमार यावेळी म्हणाले. जातीच्या आधारावर जनगणना प्रत्येकाच्या हिताची आहे. अशी जनगणना कोणत्याही जातीच्या समुहाला अस्वस्थ करेल अशी चिंता करणे निराधार आहे, असे नितीश कुमार यांनी पूर्वीही अनेकदा म्हटले आहे. जातीची जनगणना करायची की नाही हे केंद्रावर अवलंबून आहे. आमचे काम फक्त आमचे मत मांडणे आहे. जातीनिहाय जनगणना एका जातीला आवडेल आणि दुसर्याला आवडणार नाही, किंवा कोणी नाराज होईल, असे समजू नका. ही जनगणना प्रत्येकाच्या हिताची आहे, असे नितीश कुमार म्हणाले होते. नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारच्या अनेक नेत्यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.

COMMENTS