Homeताज्या बातम्यादेश

इस्त्रो अध्यक्ष सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरून गदारोळ

के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा आरोप अखेर प्रकाशनच केले रद्द

बंगळुरू : इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ सध्या वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहेत. त्यांचे आत्मचरित्र प्रकाशन होण्यापूर्वीच वादात सापडले आहे. कारण इस्त

राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर : नवाब मलिक
शरद पवारांची रणनीती मोदी सरकारला शह देणार का ? l Lok News24
जायकवाडी धरणावर ड्रोनने टेहळणी

बंगळुरू : इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ सध्या वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहेत. त्यांचे आत्मचरित्र प्रकाशन होण्यापूर्वीच वादात सापडले आहे. कारण इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्यावर या आत्मचरित्रात टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असून, अखेर हा वाद टाळण्यासाठी सोमनाथ यांनी हा प्रकाशनाचा सोहळाच रद्द केला आहे. इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ चंद्रयान 3, गगनयान सारख्या मोहीमा यशस्वी केल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. तसेस आदित्य एल 1 ही मोहीम सुद्धा यशस्वी झाली. दरम्यान, यावरून त्यांचे कौतुक होत असतांना एस. सोमनाथ यांच्यावर आता टीका होत आहे. एस. सोमनाथ यांनी ‘निलावू कुडीचा सिंहगल’ हे मल्याळम भाषेतील आत्मचरित्र लिहिले असून याचे पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते. मात्र, या आत्मचारित्रावरून गदारोळ झाल्याने त्यांनी हे प्रकाशन रद्द केले आहे. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रात के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आल्याचा दावा काही जणांनी केला आहे. यावरून हा वाद झाला आहे. सोमनाथ यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांनी हस्तक्षेप केला होता, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, हे पुस्तक प्रकाशीत होण्याआधीच त्याच्या प्रती या बाहेर गेल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमनाथ यांनी हे पुस्तक प्रकाशन रद्द केले आहे.

कुणावर टीका करण्याचा उद्देश नाहीः सोमनाथ – इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ या वादानंतर म्हणाले की, जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे आत्मचरित्र लिहिले आहे. हे चरित्र कोणावरही टीका करण्याकरता लिहिलेले नाही. मी माझ्या पुस्तकातून कुणावरही टीका केली नाही. तसेच कुणालाही टार्गेट केले नाही. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एखाद्या संस्थेत पद मिळवण्याकरताही अनेक आव्हाने पेलावी लागतात. या ठिकाणी एका पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असू शकतात. हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चांद्रयान 2 मोहीम अयशस्वी झाल्याच्या घोषणेच्या संदर्भात स्पष्टता नव्हती असे देखील त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

COMMENTS