Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या

पाटणा ः बिहारमधील अराहमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शेतात पीक काढत असलेल्या कुटुंबावर आरोपींनी

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या
पत्नीसह 2 मुलींची गोळ्या घालून हत्या
केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून

पाटणा ः बिहारमधील अराहमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शेतात पीक काढत असलेल्या कुटुंबावर आरोपींनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर गोळी लागल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. दोन एकर जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये अराहमध्ये दोन एकर जमिनीसाठी दोघांची हत्या करण्यात आली आहे. सशस्त्र हल्लेखोरांनी बाप-लेकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृतक त्याच्या कुटुंबीयांसह शेतात गव्हाचे पीक काढत होते, तेव्हा ही घटना घडली.

COMMENTS