Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे

पुणे : राज्यात ऐन दिवाळीत थंडीऐवजी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज बुधवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राजकीय पक्षांच्या आश्‍वासनांना बसणार “सर्वोच्च”चाप
दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
समाजव्यवस्थेत अन्यायाविरुद्ध लढणारा,जाब विचारणारा ’फकिरा’ निर्माण झाला पाहिजे-डॉ.राजेश इंगोले

पुणे : राज्यात ऐन दिवाळीत थंडीऐवजी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज बुधवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 30 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, संभाजीनगर, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर 31 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 1 नोव्हेंबरला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यात वादळी वार्‍यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

COMMENTS