देशासह राज्यात वीज संकट आणखी गडद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशासह राज्यात वीज संकट आणखी गडद

देशात केवळ नऊ दिवस पुरेल इतकास कोळसा साठा

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या आठ-आठ तासांच्या भारनियमनामुळे नागरिकांचा तीव्र संताप सुरू असतांनाच, केंद्र सरकारकडून कोळसा साठा मुबलक

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न
भाजप-मनसेचा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’
अग्नीपथ : प्रतिक्रांतीचा अंतिम हिंसक टप्पाच!

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या आठ-आठ तासांच्या भारनियमनामुळे नागरिकांचा तीव्र संताप सुरू असतांनाच, केंद्र सरकारकडून कोळसा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा सूर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लावला होता. मात्र केंद्र सरकारकडे देखील 9 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध समोर असल्याचे समोर आल्यामुळे देशामध्ये वीज संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारनेही कोळसा टंचाई असल्याचे मान्य करत उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये कोळसा टंचाई नाहीये. मात्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात कोळसा टंचाईची भीषण परिस्थिती उद्भवली आहे. यासंदर्भात केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह म्हणाले की, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूमध्ये कोळसा संकट निर्माण झाले आहे. या राज्यात कोळसा टंचाई निर्माण झालीये त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. तामिळनाडू राज्य आयात केलेल्या कोळसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोळशाचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्ही तामिळनाडू सरकारला कोळसा आयात करण्याचे आदेश दिले आहेत. तर, आंध्र प्रदेशमध्ये रेल्वे मार्गाने कोळसा पुरवला जातो. मात्र रेल्वेने कोळसा पोहोचवण्यास विलंब होत आहे. तसंच, रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटकाही बसला आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय देशात कोळशाची मागणी वाढली असून, याआधी कधीही इतकी मागणी वाढली नव्हती. देशातील कोळशाचा साठा कमी झाला आहे. आज देशात फक्त 9 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक राहिला आहे. याआधी 14- 15 दिवसांचा साठा शिल्लक असायचा. कोळशाची मागणी वाढली आहे हे खरे आहे. पण पुरवठा तितका जलद करणे शक्य नसल्याचे देखील सिंह यांनी स्पष्ट केले आहे. देशात जवळपास 10 राज्यांवर कोळसा संकट निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसंच, झारखंड, बिहार, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये मागणीच्या तुलनेत कमी वीज उपलब्ध होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 21 ते 22 हजार मेगावॅट वीजेची मागणी आहे. मात्र, तिथे फक्त 19 ते 20 मेगावॅटपर्यंत वीजेचा पुरवठा केला जात आहे.

कोळसा संपला तरी चालेल पण उत्पादन वाढवा : डॉ. राऊत
वीज निर्मिती केंद्रातील कोळसा संपला तरी चालेल पण विजेचे उत्पादन वाढवा असे आदेश विज निर्मिती कंपनीला दिल्याचे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी नागपुरात दिले. 500 मेगावॉटने विजनिर्मिती वाढवा असेही आदेश दिल्याचे राऊत म्हणाले. खुल्या बाजारामध्ये खरेदीसाठी अपेक्षित प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे असे राऊत यांनी सांगितले.

COMMENTS