वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या

Homeताज्या बातम्या

वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या

दोन्ही मुलांना विष पाजून वडिलांनी संपविलं स्वतःला दुहेरी हत्याकांडाने खळबळ

चंद्रपूर प्रतिनिधी -  दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या ग

म्हाडाच्या घरांना कोरोनाकाळातही उत्स्फुर्त प्रतिसाद
टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल-गडकरी
अटल सेतूवर मनोरुग्णाचा नग्नावस्थेत धिंगाणा

चंद्रपूर प्रतिनिधी –  दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या गावात शेतात वडिलाचा मृतदेह सापडला. विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात आर्थिक विवंचनेतून मुलांची हत्या केल्याचा तसेच आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. वरोरा शहराजवळील बोर्डा  गावात काल संजय कांबळे या व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा विष पाजून त्यांचा खून केला होता. सुमित (7) आणि मिष्टी (3) अशी मृतक मुलांची नावं आहेत. वरोरा आणि गिरड पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS