Homeताज्या बातम्यादेश

देशाची अखंडता अबाधित ठेवण्यात सैन्याचे अमूल्य योगदान

राष्ट्रपती मुर्मू ः सेना दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादननवी दिल्ली : सेना दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय सेनेला र

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा.
फायटर हेलिकॉप्टरमधून राष्ट्रपती मुर्मू यांचे उड्डाण  
मागास समुदायांच्या बदलासाठी शिक्षण महत्वाचे माध्यम

राष्ट्रपती मुर्मू ः सेना दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन
नवी दिल्ली : सेना दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय सेनेला राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी कृतज्ञतेची मानवंदना अर्पण केली. देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राखण्यात भारतीय सेनेची भूमिका अमूल्य असल्याचे सर्व नेत्यांनी या वेळी अधोरेखित केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेना दिनाच्या शुभेच्छा देताना भारतीय सेनेच्या अढळ निष्ठेचे आणि त्यागाचे विशेष कौतुक केले. सीमांचे रक्षण करण्याबरोबरच आपत्ती, संकट आणि मानवीय मदतीच्या वेळी भारतीय सैनिकांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होते आणि ती प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय सेनेच्या शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठेला नमन केले. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, निःस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेले सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीतही ठामपणे देशाचे संरक्षण करतात. त्यांच्या त्यागामुळेच देशवासीयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणार्‍या वीरांना संपूर्ण देश आदराने स्मरतो, असेही त्यांनी नमूद केले.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सेना दिनाच्या निमित्ताने अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांना अभिवादन केले. देशाच्या सुरक्षेसाठी दाखवलेले त्यांचे साहस, शिस्त आणि बलिदान प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. या पवित्र दिवशी शहीद झालेल्या वीरांना त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सेनेचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देत सेनेच्या अदम्य धैर्याचे कौतुक केले. सीमांवरील सतर्कता, संकटातील ठाम भूमिका आणि मानवीय सेवेमुळे भारतीय सेनेने जागतिक स्तरावरही मानाचा ठसा उमटवला असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज अशी सेना उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. गृहमंत्री अमित शाह यांनीही सेना दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. भारतीय सेनेच्या शौर्यगाथा इतिहासात अजरामर झाल्या असून त्या प्रत्येक पिढीमध्ये देशभक्तीची चेतना जागवतात, असे त्यांनी नमूद केले. कर्तव्यपथावर सर्वस्व अर्पण करणार्‍या वीर जवानांना त्यांनी कोटी-कोटी प्रणाम केला. दरवर्षी 15 जानेवारी रोजी सेना दिन साजरा केला जातो. 1949 साली फील्ड मार्शल के. एम. करियप्पा यांनी भारतीय सेनेचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला, त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

COMMENTS