वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावर भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावर भीषण अपघात

ट्रकचे चाक शरीरावरुन गेल्यामुळे मायलेकाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू

वाशिम प्रतिनिधी - वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावरील वाई फाट्याजवळ भीषण अपघात घडला.आई आणि मुलगा दुचाकीवरुन बाजारात जायला निघाले ह

देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या पाच जणांचा भयावह मृत्यू
पाचोर्‍यात भरधाव वाहनाने चौघांना उडवले
दुर्दैवी ! तीन जिवलग मित्रांचा मृत्यू

वाशिम प्रतिनिधी – वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावरील वाई फाट्याजवळ भीषण अपघात घडला.आई आणि मुलगा दुचाकीवरुन बाजारात जायला निघाले होते. त्यावेळी समोरुन येत असलेल्या एका भरधाव ट्रकने बाईकला जबर धडक दिली.ट्रकची चाकं शरीरावरुन गेल्यामुळे मायलेकाचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होते. या अपघातानंतर हायवेवर लोकांनी एकच गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चंद्रकला शांताराम करवते असं मृत आईचे नाव असून वसंता शांताराम करवते, असं मुलाचं नाव आहे. 

COMMENTS