Homeताज्या बातम्याक्रीडा

महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली- बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयन

कर्णधार टेंबा बवुमा ठरला दक्षिण आफ्रिकेसाठी खलनायक!
विनेश फोगट निलंबित; भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई
कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार!

नवी दिल्ली- बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. तर स्मृती मनधाना ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच श्रेयांका पाटील आणि विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया या दोघांचाही समावेश मुख्य संघात करण्यात आला आहे. मात्र या दोघी दुखापतग्रस्त आहेत. दोघीही दुखापतीतून सावरत आहेत. मुख्य स्पर्धेआधी या दोघी पूर्णपणे फीट झाल्या तरच यांना वर्ल्ड कपसाठी खेळता येईल, अन्यथा दोघांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. त्यामुळे या दोघींसमोर स्वत:ला फिट करण्याचं आव्हान असणार आहे.

COMMENTS