Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्यात नवदाम्पत्याची आत्महत्या

अवघ्या दोन-तीन महिन्यांतच संपवले जीवन

संगमनेर ः लग्नानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यातच पती-पत्नीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील साकुरम

अमृतवाहिनीचा दहावीचा निकाल 100 टक्के
जागतिक पातळीवर नगरचा झेंडा फडकवताना नगरी नगरकरांना मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा ध्यास-पदमश्री पोपटराव पवार
पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

संगमनेर ः लग्नानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यातच पती-पत्नीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये घडला आहे. रविवारी 11 ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला असून घारगाव पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरमध्ये आणले आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून प्रथम दर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा कयास असून पोलिस या दाम्पत्याने आत्महत्या का केली, की अन्य काही प्रकार आहे याचा शोध घेत आहे. वैभव दत्तात्रय आमले (वय 23 वर्ष) आणि स्नेहा वैभव आमले (वय 20 वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवदांपत्याचे नाव असून साकुरच्या मुळा नदीजवळ मांगमळीत रविवारी (11 ऑगस्ट) रात्री काही ग्रामस्थांना त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले होते. घटनेची माहिती तातडीने घारगाव पोलिसांना दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरला पाठविले आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होईल. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेले हे नवदांपत्य पुण्यात नोकरी करत होते. मात्र त्यांनी गावाकडे साकुरला येत रविवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

COMMENTS