कोपरगाव - एमबीए व पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम गतिमानतेने अभ्यासून ध्येयापर्यंत पोहचावे, मात्र यासाठी मन खुले ठेवुन नवन

कोपरगाव – एमबीए व पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम गतिमानतेने अभ्यासून ध्येयापर्यंत पोहचावे, मात्र यासाठी मन खुले ठेवुन नवनवीन संकल्पना आत्मसात कराव्या, आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसारच पुढे जा, आपले स्वप्न निश्चित पूर्ण होईल, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिला.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए व पीजीडीएमच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दुसर्या प्रमुख पाहुण्या, आदित्य बिर्ला कॅपिटलच्या उपाध्यक्षा डॉ. कविता राव, साऊथ आफ्रिकेतील दुर्बन युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नॉलाजीच्या बिझिनेस स्कूलचे प्राद्यापक डॉ.रविंदर रेना, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. क्षिरसागर, संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेट स्टडीजचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. मालकर यांनी सर्वांचे स्वागत करून एमबीए विभागाच्या प्रगतीचा आलेख मांडत शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील सर्व विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकर्या मिळवुन देण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार पीजीडीएम हा कोर्सही चालु वर्षी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काळकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनीआपल्या क्षमता वाढवाव्यात, संभाषण कौशल्य सुधारावे, सहकार्य आणि टीम वर्क साठी परस्परातील जाळे मजबुत करावे, आत्मविश्वास अंगी बाळगावा, चांगल्या ध्येयाचे स्वप्न बाळगावे. डॉ. कोल्हे यांनीही संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सर्व नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून सांगीतले की, 2010 मध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 60 होती, आता ती 240 झाली आहे व हे सर्व प्रवेश पूर्ण क्षमतेने भरतात. याचे सर्व श्रेय शिक्षकांना जाते. माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचा उत्कृष्टतेचा वसा संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे समर्थपणे पुढे नेत आहे. कोणतेही यश हे अकस्मात मिळत नाही तर त्यासाठी सातत्य ठेवावे व यशस्वी व्हावे, असे डॉ. कोल्हे शेवटी म्हणाल्या. नवीन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू होऊन 2 महिने झाले. या दोन महिन्यांच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये कसे सकारात्मक बदल झाले, याचे कथन काही विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सिनिअर विद्यार्थ्यांचा तसेच नव्याने स्थापन झालेल्या विविध मंचांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
COMMENTS