Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायन-ठाणे प्रवास आता होणार सुस्साट

मुंबई : सायन-ठाणे प्रवास आता सुसाट होणार आहे. येत्या सहा महिन्यात ‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पा’अंतर्गत शीव-ठाण्याला जोडण्यात येणार्‍या मार्गाव

यंदाच्या वर्षीही आषाढी वारी पायी नको ; संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र
पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील टेलरच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड

मुंबई : सायन-ठाणे प्रवास आता सुसाट होणार आहे. येत्या सहा महिन्यात ‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पा’अंतर्गत शीव-ठाण्याला जोडण्यात येणार्‍या मार्गावरील 680 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे. सध्या 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर अखेर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सायन ठाणे प्रवास जलद करण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे 250 कोटी रुपये खर्चाचा ‘छेडानगर वाहतूक सुधार प्रकल्प’ सुरू केला आहे. या अंतर्गत तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे छेडा नगर येथे बांधण्यात येत आहेत.

COMMENTS