शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड येणार एकत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड येणार एकत्र

राज्यात पुन्हा एकदा नवे राजकीय समीकरण

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात बहुमत सिद्ध करण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. मात्र श

हिंदूत्वाची ताकद तुम्ही गोठवली ; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली
पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात बहुमत सिद्ध करण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. मात्र शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच, काल शुक्रवारी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेला बळ मिळणार आहे.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.
आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. मी स्वागत यासाठी केले की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली. महाराष्ट्रात जे काही घडवले किंवा बिघडवले ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसे वागायला हवे. तसे वागायचे नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे. हा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल, असा आपण घडवू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलेला आहात म्हणून मी तुमचे स्वागत करतो, असे यावेळी उद्धव टाकरे संभाजी ब्रिगेडला उद्देशून म्हणाले. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनवरे म्हणाले की, ’नवीन समीकरण राज्यात तयार होत आहे. आमची संघटना 30 वर्षांपासून काम करत आहे. संघप्रणित विचारांचा उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. लोकशाही अस्तित्वात ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र आली आहे.’

प्रादेशिक अस्मिता आणि संविधासाठी एकत्र ः उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS