Homeताज्या बातम्याशहरं

राष्ट्रवादीविरुध्द बंड, सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या गोटात

इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिवसेना कोणीही सोडणार नाही. आमचा रोष राष्ट्रवा

शिवप्रेमी प्रेक्षकांनी अनुभवला शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातील थरार
कराड शहरात टोळी युध्दातून एकावर खूनी हल्ला
मार्चअखेर कोल्हापूर शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस

इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिवसेना कोणीही सोडणार नाही. आमचा रोष राष्ट्रवादीवर आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून सहा महिन्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेचे खच्चीकरण करताना शिवसैनिकांवर गंभीर स्वरूपाच्या कारवाया पोलिसांकडून करवून घेतल्या. आमचे बंड हे पक्षाविरुध्द नसून राष्ट्रवादीच्या विरोधात आहे, असे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात उडी घेतली.
येथील शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पवार यांनी पत्रकार बैठक घेऊन आपण शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे जाहीर केले. पवार म्हणाले, शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांना दिली होती. मात्र, त्यांच्याकडून कसलाही आधार मिळाला नाही किंवा त्यांनी लक्षही घातले नाही. त्यातच पालकमंत्री जयंत पाटील हे नेहमीच शिवसेनेची गळचेपी करत आले आहेत. पोलीस, जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व विभागात त्यांनी शिवसैनिकांच्या कामाची अडवणूक करण्याचे आदेशच अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे हे बंड राष्ट्रवादीविरुध्दच आहे.
मंत्री जयंत पाटील यांनी निधी अडवून धरला
जिल्हास्तरीय समितीमध्ये शिवसैनिकांना डावलण्यात पालकमंत्र्यांची भूमिका आहे. जिल्हा नियोजनमधील एक पैशा निधी त्यांनी शिवसेनेला दिला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासाला दिलेला 11 कोटींचा निधी पालकमंत्र्यांनी अडवून धरला. मात्र, आमच्या पाठपुराव्याने शिंदे यांनी तब्बल 21 कोटींचा निधी दिला. या निधीतूनच शहरातील रस्ते, गटारी व इतर विकासकामे सुरू आहेत.
शिवसेनेचे राष्ट्रवादीने मोठे नुकसान केले
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडेही शिवसैनिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यावर पक्षाकडून काय कारवाई होते हे पहावे लागेल. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसेनेचे मोठे नुकसान केले आहे. राष्ट्रवादीच्या मनमानीविरुध्द हे बंड आहे. आगामी पालिका निवडणूक ही विकास आघाडीसोबत शिवसेना म्हणूनच लढणार आहोत.
यावेळी दि. बा. पाटील, शकील सय्यद, सागर मलगुंडे, वीर कुदळे, राजेंद्र पवार, उमेश पवार, डॉ. सचिन पाटील, अंकुश माने, सतीश पाटील, प्रताप खराडे, सचिन कुचीवाले, योगेश हुबाले उपस्थित होते.

COMMENTS