राज्यात सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा

स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी घेणार निर्णय

मुंबई : राज्यात कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा 31 जानेवारीपर्यंत तर महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनाचा रुग्णसंख्य

भयंकर कृत्य ! पोलिसांच्या समोर पत्नीच्या तोंडात टाकले विष.
शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शोधतात नवनवीन मार्ग……. 
मान्सूनची वाटचाल मंदावली

मुंबई : राज्यात कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा 31 जानेवारीपर्यंत तर महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनाचा रुग्णसंख्येचा कमी झालेला आलेख आणि शाळा सुरू करण्याचा पालकांनी घेतलेला पवित्रा या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी 24 जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याविषयी बोलतांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सगळ्यांचे मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असे होते. कालच त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथे 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. मुलांचे आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य राहिलेले आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवले पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असतांना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळे शाळा सुरु करत असतांना नियमावलीचे पालन केले पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असे, वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत.निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणार्‍या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळं निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या काळात आम्ही निर्णय घेणार आहोत. शाळा सुरु करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ज्ञ, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातालील अधिकार्‍यांशी चर्चा करत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याच्या फाईल वर सही केली आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

ऑनलाईन शिक्षण देखील राहणार सुरू
कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहे. तसेच जिथे कोरोना नियमावली पाळली जाईल तिथेच शाळा सुरू होतील. याबरोबरच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS