Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर वीज संकटाचे सावट

सध्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सुरू

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात चांगला पाऊस झाला असून, वीजेची मागणी घटली असली तरी देखील राज्यावर वीजेचे संकट निर्माण होतांना दिसून येत आहे. याचे प्रमुख

शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा आर्थिक फायदा व्यापार्‍यांनाच
लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांची हुकूमशाही ; आंदोलकांना घेतले ताब्यात
नक्षली कमांडर संतोष शेलार पोलिसांना शरण

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात चांगला पाऊस झाला असून, वीजेची मागणी घटली असली तरी देखील राज्यावर वीजेचे संकट निर्माण होतांना दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट घोघांवतांना दिसून येत आहे.
सलग तिसर्‍या दिवशी राज्यातील सातही औष्कि विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. त्यामुळे, राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे. वास्तविक मुसळधार पावसाने कोळसा ओला झाला आहे. तसेच दुरुस्तींच्या कामामुळे सातही केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. त्याचाच हा परिणाम दिसून येऊ शकतो. राज्याची 9540 मेगॅव्हॅटची क्षमता असताना सध्या फक्त 4732 मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे आधीच तुटवडा असताना आता त्यावर आणखी परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरुन राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसर्‍या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासमोरील वीज संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील वीज निर्मितीची क्षमता पाहता, त्याच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. राज्यात सततचा पाऊस, त्यामुळे ओला झालेला कोळसा आणि आधीच सुरु असलेली दुरुस्तीची कामे ही या मागची कारणे आहेत. त्यामुळे सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे.

COMMENTS