Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

30 सप्टेंबरनंतरच होणार निवडणुका ः सहकारमंत्री सावे यांची माहिती

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील तब्बल 6 हजार 510 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यामुळे या निवडणुका कधी होतील, अशी विचारणा होत

प्रियदर्शनी मुंडे, पृथ्वीराज मुंडेचे अबॅकस आंतरराष्ट्रीय परिक्षेत यश
कुकडीच्या पाणीप्रश्‍नावर आंदोलन करणार्‍या चौघांना अटक
लोणारकाव्याचे लोणारकार

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील तब्बल 6 हजार 510 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यामुळे या निवडणुका कधी होतील, अशी विचारणा होत असतांना, 30 जूननंतर होणार्‍या संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबरनंतर होणार असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण होते. यासोबतच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. याच कारणांमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले आहे. राज्यात 82 हजार 631 सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी 49,333 सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून 48 हजार 667 संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत. राज्यात 30 जूननंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अशात जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी आणि मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS