देवळाली प्रवरा प्रतिनिधी -राहुरी तालुक्यातील उंबरे येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी विवाह करून आलेल्या नवविवाहित तरुणीने दुसर्याच दिवशी सुमारे लाखभर

देवळाली प्रवरा प्रतिनिधी -राहुरी तालुक्यातील उंबरे येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी विवाह करून आलेल्या नवविवाहित तरुणीने दुसर्याच दिवशी सुमारे लाखभर रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची उंबरे परिसरात प्रचंड चर्चा सुरू आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील एका मध्यस्थीने सुमारे एक लाख रूपये कमीशन घेऊन उंबरे गावातील एका तरुणाचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका तरुणीशी पाच ते सहा दिवसांपूर्वी लावून दिला होता.
नव वधूला विवाह सोहोळ्यात सुमारे लाखभर रूपयांचे सोन्याचे दागीने वराकडून घालण्यात आले होते. सदर विवाह हा हिंदू पद्धतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. विवाह सोहोळ्यात वर्हाडी मंडळींना पाची पक्वान्नचे मिष्ठान भोजन देण्यात आले. विवाह सोहळा संपन्न झाल्या नंतर नव वधू ही वराच्या घरी म्हणजे उंबरे या ठिकाणी आली. लग्नाच्या दुसर्या दिवशी नव वधू व वर दोघे उंबरे परिसरातील काही मंदिरात गेले आणि जोडीने देव दर्शन घेतले. देव दर्शन करुन वर व वधू पून्हा घरी परतले. त्याच दिवशी सायंकाळच्या दरम्यान नव वधू ही वराच्या घरातून अचानकपणे अंगावरील सोन्याच्या दागिन्यासह बेपत्ता झाल्याचे दिसून आले. नव वधूच्या सासरकडील लोकांनी तीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी विवाह जुळवून देणार्या मध्यस्थीला फोन करुन नव वधू बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्या मध्यस्थीने तीचे माहेर असलेल्या वैजापूर येथील तीच्या नातेवाईकांना फोन करुन चौकशी केली. त्यावेळी ती नव वधू माहेरी पोहचल्याचे समजले. या घटनेतील वर व त्याच्या घरच्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मध्यस्थी करणार्या तरूणाकडे कमीशन दिल्याचे एक लाख रूपये व नवरीला घातलेले दागीने परत करण्याची मागणी केली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
COMMENTS