Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पदरमोड करून आमदार काळेंनी ठेवली उजनी चारी योजना

योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस कायम

कोपरगाव : रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली र

एका वर्षात नोकरी देणारा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम ः परशराम साबळे
संजीवनी कोविड सेंटर मुळे तालुक्याला मिळाला दिलासा
प्रा. सचिन गायवळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोपरगाव : रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना 2015 ला बंद पडल्यानंतर हि योजना पुन्हा सुरु होईल याची अपेक्षा या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावातील नागरीकांनी सोडली होती. परंतु दिलेला शब्द पूर्ण करून दाखवायचाच या उद्देशातून पदरमोड करून उजनी चारी योजनेला ऊर्जितावस्थेत आणून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हि योजना पाच वर्ष सुरु ठेवण्याची परंपरा आ.आशुतोष काळेंनीही जपली असून दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला आहे.
            कायम स्वरूपी दुष्काळी असणार्‍या जिरायती भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्‍न सुटावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला न परवडणारी योजना असा ठपका ठेवत ह्या योजनेला अपूर्णावस्थेतच असतांना जाणीवपूर्वक बासणात गुंडाळून ठेवली होती. मात्र माजी आमदार अशोकराव काळे यांनी 2005 साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत स्वत: आर्थिक झळ सोसून हि योजना पूर्ववत सुरु करून सलग 10 वर्ष हि योजना चालविली. या योजनेतून पाझर तलाव भरले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्‍न बर्‍याच अंशी सुटण्यास मदत तर झालीच परंतु त्याचबरोबर भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत झाल्यामुळे पश्‍चिम भागातील या गावांना त्या 10 वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर 2014 ते 2019 या पाच वर्षात रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हि योजना बंद राहीली. त्यामुळे या भागातील शेती व शेतकर्‍यांचे भवितव्य धोक्यात येवून या दुष्काळी गावातील नागरिकांच्या नशिबी पुन्हा वनवास आला होता. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आ.आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचा शब्द या भागातील शेतकर्‍यांना दिला  होता. त्यामुळे हा शब्द पाळण्यासाठी त्यांनी आजवर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी हि योजना मागील चारही वर्ष यशस्वीपणे चालविली. ही योजना सुरु करतांना नेहमीच्या असलेल्या अडचणी येतच होत्या. यामध्ये विद्युत मोटारीचे विज बिल, पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील लिफ्टच्या नादुरुस्त विद्युत मोटारींची दुरुस्ती, नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती, चार्‍यांची कामे तर होतीच सलग पाच वर्ष हि कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार सोसून आ.आशुतोष काळे यांनी कामे पूर्ण केली. मात्र यावर्षी या योजनेचे वीज कनेक्शन ज्या विद्युत रोहित्रावर जोडले आहे त्या विद्युत रोहित्रातील तांब्याची तार व त्यातील ऑईल चोरट्यांनी चोरून नेल्याचे वीज कनेक्शन जोडतांना लक्षात आल्यामुळे काहीशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आ.आशुतोष काळे यांनी या अडचणीवर देखील तात्काळ मात करून स्व-खर्चातून 600 के.व्ही.ए.क्षमतेचा ट्रान्सफार्मर या योजनेसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येणार्‍या सर्व अडचणी व सर्व अडथळे पार करून शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही व दिलेला शब्द देखील वाया जाणार नाही याची दक्षता घेवून सलग पाचही वर्ष हि योजना यशस्वीपणे चालवून दाखवत आ.आशुतोष काळे यांनी आपला शब्द पाळला आहे. रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकर्‍यांसाठी आधारवड असलेल्या या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेसाठी ओव्हरफ्लोचे पाणी आरक्षित असून  आ.आशुतोष काळे यांनी या योजनेच्या स्वतंत्र फिडरसाठी 3 कि.मी. अंतराच्या वीज वाहिनीसाठी निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. ही मागणी लवकरच पूर्ण होवून या योजनेसाठी स्वतंत्र फिडरवरून वीज पुरवठा होऊन बहुतांशी अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. जिरायती गावातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेली  हि योजना यापुढील काळात देखील अविरतपणे सुरु राहणे अत्यंत गरजेचे असून यापुढे कितीही अडथळे आले तरी ही योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS