Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौकशी एजन्सीचा गैरवापर करत विरोधकांना झुकवण्याचे काम सुरू- मंत्री एस.निरंजन रेड्डी

अहमदनगर प्रतिनिधी - तेलंगणा राज्याचे प्रतिबंध आणि अबकारी, क्रिडा आणि युवा सेवा, पर्यटन आणि सांस्कृतिक आणि पुरातत्व मंत्री व्ही. श्रीनिवास ग

चौपदरीकरण रस्त्यांमुळे शहराचे सौंदर्य वाढणार – महसूलमंत्री ना.थोरात
प्रशासकांच्या काळात सुमारे 50 कोटीची वसुली ; रेखी यांचा दावा, मार्चपर्यंत नगर अर्बन बँक नफ्यात आणण्याचा विश्‍वास
सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी : लोककला पथकांचा जागर सुरू

अहमदनगर प्रतिनिधी – तेलंगणा राज्याचे प्रतिबंध आणि अबकारी, क्रिडा आणि युवा सेवा, पर्यटन आणि सांस्कृतिक आणि पुरातत्व मंत्री व्ही. श्रीनिवास गौड, तसेच कृषी सहकार आणि पणन मंत्री एस.निरंजन रेड्डी यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांची ईडी चौकशी सुरू असून आमची पार्टी लीगल केस करणार आहेत. कोणावर चिखल उडवणे सोपे आहे. आमच्यावर उडवलेले चिखलाची आम्ही न्यायालयात साफ सफाई करणार असल्याचे यावेळी निरंजन रेड्डी म्हणाले आहे. 

येत्या सहा ते सात महिन्यात तेलंगणा राज्यात निवडणूक लागणार असुन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भाजप सरकार काढून कारवाई केल्या जात आहे. महाराष्ट्रात काय झाले विरोधक सत्तेवर होते म्हणुन भाजपने जबरदस्तीने विरोधाकांडून सत्ता मिळावली आहे. देशातील अनेक राज्यात भाजपने अशीच सत्ता मिळावली असल्याचा घणाघाती आरोप तेलंगणा राज्याचे मंत्री निरंजन रेड्डी यांनी यावेळी केला आहे. तेलंगणा राज्यातील विकासाचा कुठल्याही मुद्द्यावर भाजपने साथ दिली नाही. विरोधी पक्षाला भाजप दुष्मनासारखे वागणूक देत आहे. दुष्मन सुद्धा देशाला अशी वागणूक देत नाही त्याच्यापेक्षा बिगर भाजप विरोधकांना वागणुक देत असल्याची टिका निरंजन रेड्डी यांनी केली आहे. 

COMMENTS