Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलग 11 व्यांदा व्याजदर जैसै थे !; विकासदर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सलग 11 व्यांदा व्

विकेंद्रीकरणाऐवजी व्यक्तीकेंद्रीत सत्तेची वाटचाल चिंताजनक !
ढोरसडे शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
जामखेड तालुक्यातील चौंडी-गिरवली-कवडगाव-अरणगांव यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्ती 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सलग 11 व्यांदा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे रेपो रेट हा 6.5 टक्क्यांवर कायम असेल. सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र यावेळेस देखील कर्जदारांची निराशा झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळीही आरबीआयने रेपोरेट कायम ठेवला आहे. त्यामुळे सलग 11 व्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच आर्थिक विकास दर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

COMMENTS