Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारत सेमीकंडक्टरमध्ये जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदींचा विश्‍वास

नवी दिल्ली : येणारा काळ हा तंत्रज्ञान केंद्रीत असेल आणि सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार असेल तसेच तो दिवस दूर नसेल ज्यावेळी सेमीकंडक्टर उद्योग

पंतप्रधान मोदींना दाऊदचे गुंड ठार मारणार
डॉ. आंबेडकरांचे कार्य कधीही विसरता येणार नाही : पंतप्रधान
चांद्रयाननिमित्त राष्ट्रीय अंतराळ दिनाची घोषणा  

नवी दिल्ली : येणारा काळ हा तंत्रज्ञान केंद्रीत असेल आणि सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार असेल तसेच तो दिवस दूर नसेल ज्यावेळी सेमीकंडक्टर उद्योग हा आपल्या मूलभूत गरजांचा देखील आधारस्तंभ असेल, भारत हा सेमीकंडक्टरमध्ये जागतिक केंद्र बनेल असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन 2024 परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे सेमीकंडक्टर मार्केट हे स्पेशल डायोड आहे, जे दोन दिशांनी ऊर्जा देते. तुम्ही गुंतवणूक करा, मूल्य निर्माण करा, सरकार तुम्हाला स्थिर धोरणे आणि व्यवसाय करण्यास सुलभता देईल. सेमीकंडक्टर चिप उद्योग एकात्मिक सर्किट्सशी जोडलेला आहे, भारत तुम्हाला एकात्मिक इकोसिस्टम देखील देतो. ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन 2024 परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सर्वोच्च जागतिक चिप कंपन्यांच्या अधिकार्‍यांना देशातील सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले की, भारतात त्रिमितीय शक्ती आहे. पहिले, भारताचे सुधारणावादी सरकार, दुसरे, वाढणारा उत्पादन आधार आणि तिसरे, भारताची महत्त्वाकांक्षी बाजारपेठ. तंत्रज्ञानाची जाण असलेली बाजारपेठ इतरत्र कुठेही मिळणे कठीण आहे. चिप पॉवरहाऊस बनण्यासाठी भारताला या सर्व गोष्टींची गरज आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारत एकात्मिक वातावरण, स्थिर धोरणे आणि व्यवसाय करणे सुलभ करेल. सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीसाठी भारताच्या बांधिलकीचे कौतुक करताना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले की आज जे घडले आहे ते अभूतपूर्व आहे. ज्यामध्ये संपूर्ण सेमीकंडक्टर क्षेत्रातील अग्रणींना एका छताखाली आणले गेले आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या अफाट वाढ आणि भविष्यातील व्याप्तीबद्दल ते बोलले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला जागतिक नकाशावर आणणार्‍या उद्योगासाठी आता देशात योग्य वातावरण असल्याचे नमूद करतानाच सेमीकंडक्टर उद्योगाच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र भारताकडे वळू लागले आहे, असे ते म्हणाले. भारतासाठी जे चांगले आहे ते जगासाठी चांगले असेल, असा विश्‍वास व्यक्त करून ते म्हणाले की, सेमीकंडक्टर क्षेत्रातील कच्च्या मालामध्ये जागतिक बलस्थान बनण्याची भारताकडे अद्भुत क्षमता आहे

COMMENTS