Homeताज्या बातम्यासंपादकीय

अपघातांची वाढती संख्या

देशभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अपघाताची मालिका काही संपण्याची चिन्हे नाहीत. आज या राज्यात उद्या दुसर्‍या राज्यात अशी अपघातांची मालिक

विषवृल्लीला पोसणारे कोण ?
पाक पुरस्कृत दहशतवाद  
इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार

देशभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अपघाताची मालिका काही संपण्याची चिन्हे नाहीत. आज या राज्यात उद्या दुसर्‍या राज्यात अशी अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. दररोज एका जिल्ह्यात सात-8 अपघातांच्या घटना समोर येतात, तर त्याच घटना राज्यात जवळपास 100 च्या घरात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपघात रोखायचेे कसे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. गेल्या वर्षांतील अपघातातील संपूर्ण आकडेवारी अजून समोर आली नसली तरी, जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यांत पाच हजार 897 प्राणांतिक अपघात होऊन त्यांत सहा हजार 437 जणांचा मृत्यू झाला, तर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर डिसेंबर 2022 ते 3 जुलै या सात महिन्यांतील 51 प्राणांतिक अपघातांत 106 जणांचा बळी गेला.
वास्तविक पाहता देशभरात रस्ते वेगवान होतांना दिसून येत आहे. काही दिवसांचे अंतर काही तासांत पार करता येत आहे. दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढल्या आहेत. मात्र याचबरोबर अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. दररोज होणार्या अपघातांमुळे मृत्यूची संख्या दररोज वाढतांना दिसून येत आहे. यावर गेल्या अनेक वर्षांपासून आपण उपाययोजना करत असलो तरी, अजूनही यावर उपाय निघू शकलेले नाहीत. मानवी चुका जरी या अपघाताला कारणीभूत असल्या, तरी या मानवी चुका आपण कमी करू शकलेलो नाही. देशात प्रतिवर्षी अपघातात दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातही मागील वर्षी म्हणजे 2021 साली जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 26 हजार 284 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात.हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14 टक्के सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70 टक्के लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती खुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. अपघाताची ही आकडेवारी चिंतीत करणारी आहे. बरं अपघाताचे प्रमाण केवळ एका राज्यात नाही, तर संपूर्ण देशभरात दररोज शेकडो अपघात होता. त्यात शेकडो जणांचा मृत्यू होतो, आणि हळहळ व्यक्त करुन, या अपघाताकडे दुर्लक्ष केल्या जाते. मानवी चुका कमी करण्यासाठी, अनेक कायदे करण्यात आले. मात्र कायदा करून त्यावर अंमलबजावणी होत नसेल, तर त्या कायद्याचा काय उपयोग? वाहनचालकांना कडक शिस्त लावणे गरजेचे आहे. कारण रस्त्यावर वाहनांची गर्दी असली तरी आपले वाहन जबरदस्तीने पुढे नेण्याच्या प्रयत्नात नेहमीच छोटे अपघात होतच असतात. तर कधी रात्रीच्या वेळी ट्रक, तसेच मोठ-मोठे सामान वाहतूक करणार्या गाडया बेदरकारकपणे चालवल्या जातात. तर बर्याचवेळेस या चालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवतांना दिसून आले आहे. त्याचप्रकारे रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, धोक्यांच्या फलकांची उणीव, रात्री रस्त्याच्या पट्ट्याच न दिसणे, प्रखर दिव्यांचा वापर अशी अनेक कारणे आहेत. रस्ते चांगले झाल्याचा परिणामही काही ठिकाणी अपघात वाढण्यात झाला आहे. धोकादायक वळणे कमी करण्याचा प्रयत्न रस्ते बांधकाम विभागाने केलेला नाही. त्यामुळेही अपघात वाढतात. रस्त्यांवर किती वेगाने वाहन चालविले पाहिजे, याची नियमावली असताना ती कुणीच पाळत नाही. अति घाई संकटात नेई, असा अनुभव पदोपदी येत असूनही त्यातून कुणी काही धडा घेत आहे, असे दिसत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात 2025 पर्यंत 50 टक्के घट होण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र हा आकडा सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. 

COMMENTS